विचार बाबांचे.....

विचार बाबांचे

१) "शिका...! संघटीत व्हा...!संघर्ष करा....!"

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर

२) "तुमच्या मताची, किंमत मीठ मिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा ते, मत विकत घेऊ पाहणाऱ्याइतके कंगाल कोणीच नसेल..."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

३) "लोकांच्या अंगात देवी, भुतच कां येतात.., न्युटन आयझॅक, कोपर्निकस यांच्यासारखे शास्त्रज्ञ कां येत नाहीत...? जेव्हा शास्त्रज्ञ अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल..."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

४) "समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही. समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्तीचा विकास होतो."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

५) "माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती आपल्या दुर्गुणांची...."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

६) "प्रज्ञा, शील, करुणा, विद्या, मैत्री या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे..."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

७) "मोठ्या गोष्टींचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते..."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

८) "जेथे एकता~तेथेच सुरक्षितता"

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

९) "काम लवकर करावयाचे असेल, तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१०) "दैवावर भरवसा ठेवून वागू नका, जे काम करावयाचे असेल ते आपल्या मनगटाच्या जोरावर करा..."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

११) "आत्मोद्धार हा दुसर्याच्या कृपेने होत नसतो, तो ज्याचा त्याने करायचा असतो..."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१२) "विचारक्रांती झाल्याशिवाय आचारात फेरबदल होवू शकत नाही. आचारात फेरबदल करावयाचा झाल्यास आधी मनावर बसलेल्या जुन्या विचारांची छाप काढून टाकणे अगदी अगत्याचे आहे...."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१३) " माणूस हा धर्मा करीता नसून, धर्म हा माणसा करिता आहे..."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१४) "सेवा जवळून, आदर दुरून, व् ज्ञान आतून असावे..."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१५) "जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्याईतकी बुद्धी ठेवतात, स्वाभिमान ज्याला आहे, तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१६) "स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नसतात, ते स्व-सामर्थ्याने संपादन करावयाचे असतात, देणगी म्हणून ते लाभत नसतात..."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१७) "ज्याप्रमाणे कोणत्याही राष्ट्राला दुसर्या राष्ट्रावर राज्य करण्याचा अधिकार नाही,त्याचप्रमाणे, कोणत्याही एका विशिष्ट वर्गाला दूसर्या वर्गावर अधिसत्ता गाजविण्याचा अधिकार नाही..."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१८) "ज्या राष्ट्रात माझ्या अस्पृश्य बांधवांची माणूसकी धूळीप्रमाणे तुडविली जात आहे, ती माणुसकी मिळवण्यासाठी या राष्ट्राचे मी कितीही नुकसान केले तरी ते पाप न ठरता पुण्यच ठरणार आहे...."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१९) "माझा जन्म सर्वसाधारण जनतेची जबाबदारी घेण्यासाठी असावा."- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

२०) "तुम्ही आपली गुलामगिरी नष्ट करा.स्वाभिमान शुन्यतेचे जीवन जगणे नामर्दपणाचे आहे."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

२१) "आपण मला देवपदाला चढवू नका. एखाद्या व्यक्तीला देवपदाला चढवून इतराने आंधळेपनाने त्याच्या मागे धावत जावे, हे मी तरी कमकुवतपनाचे लक्षण मानतो..."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

२२) "माणसाने खावे जगण्या साठी, पण जगावे समाजासाठी...."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

२३) "दुसर्याच्या सुख-दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे..."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

२३) "पती आणि पत्नी यांच्यातील संबंध जवळच्या मित्रांसारखे असावेत..."

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

जय भिम …
[blogger]

Author Name

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.