"मुलनिवासीयांचे अधिकार फक्त कागदावरच"
माझ्या कविता...
"जिवघेवू निवडणूक"
मुलनिवासीयांच्या आरश्रणासाठी
बिरसा मुंडानी प्राणाची आहूती दिली
मुलनिवासीयांच्या हक्क अधिकारासाठी
मरणाच्या शेवट पर्यंत साथ दिली!
मुलनिवासीयांचे आरश्रण आज कागदावरच आहे
पण कुणीच बिरसा मुंडा होत नाहीत...
मुलनिवासीयांच्याच मतावर
निवडून येतात,
तरी मुलनिवासीयांना आरश्रण
देत नाहीत.
"स्वातंञ्याचे घाव"
आदिवासायांच्या स्वातंञ्यासाठी
आज पुन्हा प्रयत्न करू
मुलनिवासीयांच्या हक्कासाठी
आता पुन्हा रनमैदानी मरू
दुश्मनांचे हाल बेहाल करू
शरीरावरती तलवारीचे घाव घेऊनी मरू
आता पुन्हा अधिकारापासुन माघे नाही सरू
आदिवासीयांच्या स्वातंञ्याचे आंदोलन करूया सुरू.
ह्या कवीता माझ्या "उलगुलान" (एक संघर्ष) या छोट्यास्या कवीतेच्या पुस्तकातील आहेत.
आदिवासी बांधवानो पेटून उठा
आपल्या हक्कासाठी जिव मुठीत घेवून सुटा...
स्वातंञ्याचा दिवस ऊजडलाच पाहीजेत.
बिरसा मुंडा आपल्या आर्थिक मालमत्तेवर आलेच पाहीजेत...
रूपयावर व नोट वर बिरसा आलेच पाहीजेत.
कारण आपण मुळनिवासी आहोत.
दुर्गादास गुव्हाडे