बुध्दाने चार आर्य (महान) सत्ये सांगीतली ज्यावर संपूर्ण बौध्द धर्म आधारलेला आहे.हि चार आर्य सत्ये खालील प्रमाणे आहेत.
1)जगात दुःख आहे.जीवन हे दुःखमय आहे.
2)दुःखाला कारण आहे.
3)दुःख नष्ट केले जाऊ शतकते.
4)दुःख नष्ट करण्याचा मार्ग आहे.
जगात दुःख आहे या महान सत्याला कुणी नाकारू शकत नाही.बुध्द मनतात, जन्म दुःखकारक आहे,म्हातारपण दुःखकारक आहे,दारीद्रय दुःख कारक आहे, रोग दुःखकारक आहे मरण दुःखकारक आहे.अप्रिय व्यक्तींचा संबंध आणी प्रिय व्यक्तिंचा वियोग दुःखकारक आहे.एखांद्या वस्तूची इच्छा करून ती न मिळणे दुःखकारक आहे जाकतीक आकडेवारी सांगते की आजच्या तथाकथित युगात 70 ते 80 टक्के लोक गरीब आणी दुःखी आहेत.
**********************************
त्यांच दुःख नष्ट करण्याचे पंचशिल तत्व...
1)मी कोणत्याही प्रकारची हिंसा करणार नाही.
2)मी कुणाचे नुकसान करण्याच्य हेतूने खोटे बोलणार नाही.
3)मी व्यभिचार (परस्ञीगमन किंवा परपुरूषगमन) करणार नाही.
4)मी चोरी करणार नाही.
5)मी कोनत्याही नशा आणणाय्रा पदार्थांचे सेवन करणार नाही.
या नियमाचे पालण केल्यास आपले दुःख नष्ट होतील.
पाहूत कोन कोन या बुध्दांच्या विचाराचे पाईक आहेत.